!!! कदम शिरीषकुमार जि. प. प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड जि. अहमदनगर माझ्या ब्लॉगवर आपले मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहे !!!...

Pages

23 मार्च "शहीद दिन"

                                           " 23 मार्च "शहीद दिन "

                                शाहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू अमर रहे..
                               ◆इंक़िलाब ज़िन्दाबाद◆

                                            ●23 मार्च "शहीद दिन"●

     हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे स्मरण करू या, राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या महान क्रांतिकारक यांचे आज स्मरण करू या...!!

                                       ■■ २३ मार्च १९३१ चा दिवस..■■

   संध्याकाळी अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीसाठी कोठडीबाहेर काढण्यात आले. भगतसिंगाच्या उजव्या बाजूस राजगुरू आणि डाव्या बाजूस सुखदेव होते . ते अतिशय शांतपणे आणि धैर्याने
' भारतमाता की जय ' आणि ' वंदे मातरम् ' चा जयघोष करीत फाशीच्या तख्ताकडे निघाले .

   मग भगतसिंग यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की , आपणास फाशी पूर्वी दोन मिनिटे आपल्या घोषणा करू द्याव्या. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने मौन राखून त्यांची ती विंनंती मान्य केली . तिघांनी मग जोरजोरात आपल्या घोषणा दिल्या. त्यानंतर ते तिघेही फाशीच्या तख्तावर चढले . त्यांचे पाय घोट्याशी  बांधण्यात आले . प्रत्येकाने आपल्या फासाचे चुंबन घेतले .

   फाशीची काळी टोपी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओढण्यात आली . नंतर ते फास त्यांच्या गळ्यात टाकण्यात आले. त्याची गाठ घट्ट झाली, तेव्हांच त्यांच्या घोषणा थांबल्या. त्यांचा आवाज क्षीण झाला.

सगळीकडे शांतता पसरली  . तख्तावरचा खटका ओढला जाताच त्याच्या फळ्या दुभंगल्या नि ते तिघेही वीर मृत्युच्या खोल दरीत लोंबकळू  लागले . फळ्या पडण्याचा आवाज होताच तुरुंगाच्या सर्व कैद्यांनी आपल्या कोठाड्यांचे गज जोर जोरात वाजवून ' वंदे मातरम् ' "भारत माता की जय" च्या  घोषणा दिल्या .

    आणि मग काही वेळाने सर्वत्र स्मशानशांतता पसरली ...!!

   "२३ मार्च २०१८ अर्थात हुतात्मा दिन..."

   भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही लाहोर जेल मध्ये २३ मार्च १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता ' भारत माता की जय' , 'वंदे मातरम' म्हणत हसत हसत फासावर चढले.

   धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां नंतर देशासाठी पारदास्यत्वाच्या श्रृखंलेत अडकलेल्या मायभुमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी तुम्ही स्वतःचे प्राणर्पण केले व अमर झाले .

  आज तुम्ही ह्या जगात नाहीत पण तुमचा पराक्रम, तुमचे शौर्य, तुमचा त्याग आणि तुमचे बलिदान आम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रेरणा देत राहील....

आजही तुमची देशनिष्ठा भारतीयांच्या मनात जिवंत आहे...

   दोस्ती असावी तर तुमच्या सारखी जी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिल....

   भगतसिंग , सुखदेव , राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र त्रिवार अभिवादन...!!

                                               🚩 वंदे मातरम् 🚩 

                                                   ★ भगतसिंग

                                                    ◆नाव :~ भागनवाला
                                                    ◆वडील :~ सरदार किशनसिंग संधू
                                                    ◆आई :~ विद्यावती

                                                     ●जन्म :~ २७ सप्टेंबर १९०७
                                                      गाव बावली जिल्हा लायलपूर,
                                                      पंजाब,पाकिस्तान

                                                     ●मृत्यू :~ २३ मार्च १९३१
                                                       लाहोर, पंजाब, पाकिस्तान

                                                   ◆संघटना :~ नौजवान भारत सभा,
                    कीर्ती किसान पार्टी, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

                                                  15.  *❒ ♦भगतसिंग♦ ❒*
                                                      ┄┅•●●●●•┅┄
                                                  🔸जन्म :~ २७ सप्टेंबर १९०७
                                                  🔹मृत्यू :~ २३ मार्च १९३१


    🔷भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो.

     🔶भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती.

    🔷गुलामी आणि दारिद्ऱ्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे तेे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.

      🔶९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकार कांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे...

 

No comments:

Post a Comment

thank you for your comment