शिवाजी महाराज
●जन्म :~ १९ फेब्रुवारी १६३०, शिवनेरी किल्ला, पुणे
●मृत्यू :~ ३ एप्रिल १६८०, रायगड
●राज्याभिषेक :~ ६ जून १६७४
★ अधिकारकाळ :~【६ जून १६७४ ते ३ एप्रिल १६८०】
★ राज्यव्याप्ती :~पश्चिममहाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
🔸राजधानी :~ रायगड किल्ला
🔹वडील :~ शहाजीराजे भोसले
🔸आई :~ जिजाबाई
💥 राजब्रीदवाक्य 💥
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।"
◆छत्रपती शिवाजीराजे भोसले◆
🔶 हे इ.स. १८१८ पर्यंत
टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग
व्यापणार्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या
सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध
ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी
असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये
छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श
शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने
मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
🔷महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी
महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा
अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’
म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजआणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त
उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजी महाराज्यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही
म्हणतात.
🔶शिस्तबद्ध लष्कर व सुघटित
प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि
प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य
शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी
काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या
२,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी
महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी
करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा
वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन्
गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस
आणले.
🔷पुणे जिल्ह्यातील जुन्नर
शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजी
महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजी महाराजांची नेमकी
जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला.
महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९
फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.त्याप्रमाणे
महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.
🔷 इतर संभाव्य तारखांमध्ये ६
एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.
त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख
शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे
फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.
💥 शिवाजी जयंती 💥
🔶 भारतात इंग्रज येण्यापूर्वी
तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन कॅलेंडर
भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.
No comments:
Post a Comment
thank you for your comment