!!! कदम शिरीषकुमार जि. प. प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड जि. अहमदनगर माझ्या ब्लॉगवर आपले मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहे !!!...

Pages

थोरपुरुष माहिती

                         थोरपुरुष माहिती

                         01. ★ विक्रम साराभाई ★

जन्म ~ १२ ऑगस्ट, १९१९
मृत्यू ~ ३१ डिसेंबर, १९७१

   हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते...

    *♦विक्रम अंबालाल साराभाई*

   हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
           *• कारकीर्द •*
   १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.
     विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

      विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग  टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.


  https://kadamshirishkuamar.blogspot.com                                                                                                                       03. \                      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 


          भारतामध्ये नवचैतन्य जागवणारा देशभक्त...!!  भजना-कीर्तनाच्या माध्यमातुन समाजसेवा, लोकजागृती, प्रबोधनवादी भजने यासारख्या अनेक....

 

                    *भारतामध्ये नवचैतन्य जागवणारा देशभक्त...!!*

                                 "हो चीड़ झूठे राह की
                                  अन्याय की अभिमानकी"

 
        असत्याला गाडून टाकन्याची आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिम्मत प्रत्येकाच्या अंगी असाविच, तरच त्या व्यक्तिमधला स्वाभिमान जीवंत राहतो. भजना-कीर्तनाच्या माध्यमातुन समाजसेवा, लोकजागृती, प्रबोधनवादी भजने यासारख्या अनेक क्रांतीतत्त्वातून संत महाहरुषांच्या विचारांचा पुरोगामी वाससा जपणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खऱ्या अर्थान् एक महान कर्मयोगी होते..

      राष्ट्रसंतांच शिक्षण जेमतेम 3 ऱ्या वर्गापर्यंतच होत परंतु 1955 च्या विश्वधर्म परीशदेतील जपानला झालेल महाराजांच क्रांतिकारी भाषण त्यांच्या अफाट विद्वत्तेची साक्ष देते..ज्यांनी आपल् आयुष्य रंजल्या गांजल्या सामजासाठी देशासाठी वेचल् त्याना आजही या अपमानाच्या आगीत जाळाव यापेक्षा मोठी शोकांतिका दूसरी काय आहे... निवृति वक्ते सारख्या एका धर्मविचावाने ग्रामगीतेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली याचा जाहीर निषेध् मी आजही करतो आणि उद्याही करेलच! म्हणावे तरी काय या संतद्रोहयाला...?

तथागत बुद्धांचा संदेश जगात पोहचवणारी ग्रामगीता ।।।
गंजेटी भोंदू साधुनवर प्रहार करणारी ग्रामागीता।।।
मानसामानसातील समूळ भेदभाव नष्ट करणारी ग्रामगीता ।।।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे भारतावर खुप मोठे उपकार आहेत हे सांगणारे ग्रामगीता।।
अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांडाला झुगारून पुरोगामी विचार देणारी ग्रामगीता ।।।

      अपृश्याच्या स्पर्शानेही विटाळ् होतो असं म्हणाणाऱ्या कुविचारी लोकांना काशी काय आपली वाटणार! मी तर म्हणेल हे त्यांच्यासाठी नाहीच कारण त्यांची ती लायकी नाही..संत विचारांचा वारसा आपल्या धमन्यात खेळवायाला माणूस मर्द असावा लागतो..! विचारांचा खरा खुरा वारसदार असावा लागतो..! संत तुकोबारायांच्या भाषेत शेवटी एकच सांगतो....
   
      तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे।
      येऱ्या गाबाळ्याचे कामा नाही ।
       

https://kadamshirishkuamar.blogspot.com

 

                          04. ★ दादासाहेब फाळके ★

🔸जन्म  :~ ३० एप्रिल १८७०
🔹मृत्यू :~ १६  फेब्रुवारी १९४४

हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते. त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते...

🔸जन्म :~ ३० एप्रिल १८७०, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत
🔹मृत्यू :~ १६ फेब्रुवारी १९४४, नाशिक, महाराष्ट्र, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ दिग्दर्शक, निर्माता

                     धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके


 


🔷हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . *१९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय.* १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो

    🔶त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्ऱ्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

    🔷छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या (चित्रपट, English:Motion Pictures) व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात (Coronation Cinema) प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला.

                             *☀दादासाहेब फाळके पुरस्कार*
     🔶दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते

 

https://kadamshirishkuamar.blogspot.com

No comments:

Post a Comment

thank you for your comment